Posts

Showing posts from February, 2018

विरोधकांचा अज्ञाज्ञी विरोध

Image
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्या घरीच हाल सोसते मराठी हे असे कितीक खेळ पाहते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ही चार वाक्य मराठी भाषा दिनी चर्चित आली...याच कारण म्हणजे मराठी भाषा दिनी विधिमंडळाच्या आवारात सामुहिक मराठी अभिमाणगीत (लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी) गायनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मराठी अभिमान गीतातील ह्या चार ओळी गाळण्यात आल्या. यावरुन विरोधकांनी सभागृहात सरकारवर आक्षेप घेत गोंधळ घातला. सरकारनेही माईक खराब झाला सांगत सारवासारव केली. आता मराठी अभिमानगीतात या ओळी न घेण्याचं कारण समजावून घेण्याकरता या कवितेचा इतिहास तपासणं आवश्यक आहे. सुरेश भटांनी ही कविता संयुक्त महाराष्ट्र लढ्यादरम्यान लिहिली त्यावेळी त्यांनी ह्या ओळी त्यात लिहिल्या नाहीत. पुढे ही कविता रुपगंधा या त्यांच्या संग्रहात प्रसिद्ध झाली. या संग्रहात देखील शेवटच्या चार ओळी टाकल्या नाहीत. 1980 दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या सभेत सुरेश भटांनी ही कविता सादर केली व ह्या चार ओळी शेवटी त्यात जोडल्या पण त्यांनी ह्या ओळी रुपगंधा संग्रहातील पुढील आवृत्तीत टाकल्या नाहीत. आज जरी आपण हा संग्रह उघडुन पाहि

सदमा

Image
श्रीदेवी यांना " अभिनयाची देवी" हे नाव उत्तमरीत्या शोभल असते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावुन सरतेशेवटी बॉलीवूडच्या देवी ठरल्या.... दक्षिण भारतातील काशी म्हणुन ओळखलं जाणाऱ्या शिवकाशी येथे 1963 साली श्रीदेवींचा जन्म झाला. वयाच्या 4 थ्या वर्षांपासून श्रीदेवींनी चित्रपटात बाल कलाकार म्हणुन काम सुरू केले.  मल्याळम, तेलगु, तामिळ, हिंदी अशा विविध भाषेतील 300 चित्रपटात काम करण्याचं भाग्य श्रीदेवींना लाभलं. भाग्यापेक्षा त्यांच्यात असलेल्या उत्तम कलाकाराने त्यांना एवढ्या मोठ्या उंचीवर नेल. 1979 साली सोलावा सावन चित्रपटातुन बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सौंदर्याची खान, उत्तम अभिनय व 80 च्या दशकात कोणी विचारही केला नसेल अस नृत्य ह्या श्रीदेवींच्या भक्कम बाजु त्यामुळे त्या बॉलीवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार झाल्या. हिंदी भाषेवर पक्कड नसल्या मुळे सुरुवातीला हिंदी चित्रपटात त्यांचा आवाज नाज ह्या डब करत असे. आखरी रास्ता या चित्रपटात तर रेखा यांनी त्यांना आवाज दिला. हिंदी भाषा बोलता न येणे ही त्यांची ऋणात्मक बाजु करीयर मध्ये आडवी आली असती पण त्यांनी हिंदी भाषा शिकुन चांदनी ह्य

मग दुःख कशाचे

Image
" दुःख" मानवी जीवनाचा अविभाज्य भाग...ज्या शिवाय जीवन कधीही पुर्ण होऊ शकत नाही. वय,स्थळ,पैसा,बुद्धी कशाचाही भेद न करता हे प्रत्येक मानवी जीवनात येणार...फक्त याचे प्रकार वेगवेगळे असणार. मग दुःख कशाचे ? त्याला भेटलं मला नाही, त्याच झालं माझं नाही या प्रकारचे दुःख मात्र दुःख नसते ही असती मानवी जीवन अस्त करण्याची प्रक्रीया ही प्रक्रिया मनुष्याला आयुष्यात कधीच उभं राहु देत नाही त्यामुळे ही दुःखाच्या बाहेरची प्रक्रिया. कारण दुःख आले की ते काही काळाने जाणारच किंवा आपण ते लढण्या समर्थ झालो की त्याचा आघात कमी होणारच यात काही शंका नाही. सुःख दुःख ही निरंतर चालणारी प्रक्रिया नसुन ते एक चक्र आहे त्यामुळे ते फिरतच राहणार पण ईर्ष्या हा बिंदु आहे तो स्तब्ध राहणार आणि तो रेघ संपवणार त्यामुळे ईर्ष्या आली की मानवी जीवनाचा शेवट होणार.... ईर्ष्य्चा रुपांतर होत ते "द्वेष"आत आणि आपापसातील आपुलकी संपवण्यास हा घटक पुरेसा आहे. स्वकीयाने काही करुन दाखवले तर त्याची प्रेरणा घेऊन पुढे गेले तर त्यापेक्षा उत्तम काम आपल्या हातुन होण्याची खात्री असते. कारण त्याच्या हातुन झालेल्या चुका टाळन्याची