साहित्यिक शंभूराजे

छ.संभाजी महाराजांची साहित्यिक ही ओळख लोप होताना दिसत आहे.
शिवपुत्र संभाजी राजे हे लढाऊ होते पण त्याचबरोबर साहित्यिक देखील होते हा गुण त्यांचा आज विसरला जात आहे. आठ भाषांवर त्यांच प्रभुत्व होत त्यामुळे त्यांच ज्ञान हे दर्जेदार होत.
छ. शिवाजी महाराज स्वर्गवासी झाल्यास हिंदवी स्वराज्याला खीळ बसली.अधिकारी लोक आपली मनमानी करू लागले.स्वराज्याचा गाडा ढासळत चाला होता.
त्यावेळेस छ. संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याला सावरल होते.स्वराज्यातील कित्येक लोकांचा विरोध पत्करून स्वराज्य पुर्वस्थितीतीवर आणलं. छ. शिवाजी महाराज इच्छित होते ते स्वराज्य पुन्हा उभारल. पण हा धोका भविष्यात ही उद्धभवु शकतो हे त्यांनी ओळखल होते म्हणुन त्यांनी स्वराज्यासाठी लिखित कायदे लिहिले, भारतातील पाहिले संविधान छ. संभाजी महाराजांनी लिहुन ठेवले.आणि या कायद्यात समानता ही सर्वात महत्वाची बाब ठेवली.हिंदवी स्वराज्यात प्रत्येकास स्वातंत्र्य व समानता असावी हे लिहुन ठेवल.
समाज व्यवस्थेवर त्यांचा इतका दांडगा अभ्यास होता की चौदाव्या वर्षी त्यांनी समाज व्यवस्थेवर आधारित व राज्य कस चालवाव हे सांगण्यासाठी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला.
त्याच बरोबर नखशिखा,नायिकाभेद,सातशातक हे ग्रंथ देखील लिहिले.
परंतु, काही लोक जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास समाजापुढे मांडत आहेत. आजची लढाई ज्ञान व बुद्धीची असल्याने त्या माध्यमातूनच त्यांना उत्तर द्या आणि या महान व्यक्तींचा केवळ वारसा न सांगता, त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणा.

जय जिजाऊ...
जय शिवराय...
जय रौद्रशंभो...
                                          - रजत देशमुख

Comments

Popular posts from this blog

इच्छाशक्तीचा सम्राट

सदमा